महत्वाचे विभाग

महाराष्ट्र स्कूल टिचर ब्लॉग मध्ये मी निलेश लटपटे आपले स्वागत करतो

February 9, 2017

राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम


🍓राष्ट्रीय जंतनाशक दिन मोहिम🍒

दि.१०/०२/२०१७ रोजी शाळा व अंगणवाडयामध्ये मुलांना जंतनाशक गोळी खाऊ घालण्याची मोहिम राबवायची आहे.



🔹जंताचा बालकांच्या आरोग्यावर होणारा परिणाम
🔺रक्तक्षय (अनिमिया )
🔺पोटदुखी,उलट्या,अतिसार,
मळमळणे
🔺भूक मंदावणे
🔺कुपोषण
🔺थकवा व अस्वस्थता
🔺शौचाच्या वेळेस रक्त पडणे
🔺पोटाला सुज येणे.

🔵 जंताचा प्रादुर्भाव थोपविण्याचे मार्ग
🔺जेवणाच्या आधी हात स्वच्छ धुणे
🔺भाज्या व फळे खाण्यापुर्वी व्यवस्थित धुणे
🔺स्वच्छ व उकळलेले पाणी प्यावे.
🔺पायात चपला,बुट घालावेत
🔺नियमित नखे कापावित
🔺शौचालयाचा वापर करावा, उघड्यावर शौचाला बसु नये
🔺परिसर स्वच्छ ठेवावा.

🔵जंताचा नाश केल्याने बालकांना होणारे फायदे
🔺रक्तक्षय (अनिमिया)कमी होतो
🔺बालक क्रियाशिल होते व रोग प्रतिकारक शक्ती वाढते.
🔺शारिरीक व बौध्दिक वाढ सुधारते
🔺आरोग्य चांगले राहते.

🔹जंतनाशक गोळी- एल्बेंडेझाॅल ४०० मि.ग्रॅम
🔺वय १ ते २ वर्ष अर्धीगोळी (२०० मि ग्रॅम)क्रश करून पाण्यात विरघळून
🔺वय २ ते 3 वर्ष एक गोळी (४०० मि ग्रॅम) क्रश करून पाण्यात विरघळून 
वय:- 3 ते19 वर्ष एक गोळी(400मि ग्रॅम)  चघळून खाऊ घालणे. 

🔵प्रत्येक शाळा,अंगणवाडीत दि १०/०२/२०१७ रोजी जंतनाशक गोळी मुलांना प्रत्यक्ष समोर उभे करुन खाऊ घालण्याची मोहिम हाती घ्यावयाची आहे.

शाळाबाहय मुले मुली यांना अंगणवाडी केंद्रात गोळया देणार आहेत.

🔹गोळी खाऊ घालण्यापुर्वी घ्यावयाची काळजी
🔺आहार खाऊ घातल्यानंतर गोळी खाऊ घालणे.रिकाम्या पोटी गोळी खाऊ घालू नये.
🔺प्रत्येक शाळेत एक आरोग्य कर्मचारी उपस्थित राहणार आहे.
🔺आजारी बालकांना गोळी देऊ नये.ते बालक ठिक झाल्यानंतर १५ फेब्रुवारी ला  गोळी देणे.
🔺गोळी दिल्यानंतर २ तास मुलांना शाळा,अंगणवाडीत थांबवून ठेवावे.
🔺गोळी खाल्यानंतर काही लक्षणे दिसल्यास क्षार संजिवनी पाजणे.त्वरीत वैदय अधिकारी यांचेशी संपर्क साधणे. 
🔺ज्यामुलांच्या पोटात जंताचे प्रमाण जास्त आहे त्यामुलांना गोळी खाल्या नंतर त्रास होण्याची शक्यता नाकारता येणार नाही.तेंव्हा घाबरण्याचे काहीही कारण नाही.

1 comment: